कोंबड्याने बांग दिली की सुमतीताई ऊठून कमरेला पदर खोचून कामाला लागायच्या. साधारण: पहाटे पाच वाजता कोंबडा बाक द्यायचा….त्यावेळी उठल्यापासून ते राञी दहा वाजता झोपेपर्यंत त्यांचा हात चालूच असायचा. ना कामाचा कंटाळा, ना शरीर थकल्याची तक्रार …त्यांना सगळ कस चकचकीत आणि टापटिपीत लागायच.
नागठाणे गावाच नाव….डोंगराच्या पायथ्याशी वसलेल होत…..गावातून नदी जायची तिही बारमाई पाणी असलेली…!
गावात एक भलमोठ खानदाणी सोपस्कार पाळणार घर होत. महत्त्वाच म्हणजे हे घर स्ञीच्या नावाने म्हणजे ‘सुमतीताईंच घर’ म्हणून ओळखल जायच.
सुमतीताईंच वय पन्नास वर्षे होत. पती नारायणरावांचा मसाले व्यवसाय होता. तोही परंपरेने चालत आलेला. माञ त्यात प्रत्येक पिढी स्वतचे कष्ट ओतत गेल्याने आजच्या काळात राणे मसाले पूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले होते…,.नारायणराव आणि सुमतीताई यांना तिन मुलं आणि एक मुलगी होती. त्यामधील दोघेजण मसाले व्यवसायात गुंतले होते तर तिसर्या मुलाने रिअल इस्टेट मधे स्वतचा बिझनेस ऊभा केला होता. मुलगीही डाॅक्टर असून तिच लग्न झाल होत.
सुमतीताईंच्या तिन्ही मुलांची लग्न झाली होती आणि तिन्हीही सुना मुलांना साजेशा आणि सुशिक्षित होत्या. रुद्र, रूग्वेद, जय आणि मुलगी नंदिनी चौघांवरही सुमतीताईं आणि नारायणरावांनी खुप चांगले संस्कार केले होते…..त्यांची “श्रम-साफल्य” वास्तू आणि त्यातील लोक संपूर्ण गावासाठी आदर्श होती.
रुद्र,रूग्वेद आणि जय तिघांनीही स्वतच्या पसंतीने लग्न करून निलीमा, मालती आणि ञिशा यांना घरी आणल होत. मुल मोठी झाल्यात त्यांना त्यांच बर-वाईट समजत; त्यामुळे सुमतीताईंनी मुलांच्या पसंतीला स्वतची अनूमती देवून सुनांना मोठ्या मानाने घरी आणल होत….आणि कायम मानाने वागवत होत्या. माञ मुलगी नंदिनीच लग्न त्यांनी स्वत: तिच्यासाठी मुलगा पसंत करून केल होत…..अर्थातच नंदिनी सूमतीताईंचीच सावली असल्याने तिने आनंदाने आईच्या निर्णयाला सहमती दिली होती व ती तिच्या संसारात खूष देखील होती…!
सुनबाई सुशिक्षीत, हायली एज्युकेटेड त्यामुळे सुमतीताईंचे घरातील काही सोपस्कार त्या मानत नसायच्या. सुमतीताई जरी जून्या काळातील असल्या तरी त्या शिक्षणाची गोडी आणि हौस असणार्या असल्याने त्या सुनांना जास्त काही बोलायच्या नाहीत…त्यांच्या कलेने घेत त्यांना घरातल्या सर्व गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करीत. मग स्वयंपाक करणे असो वा बाहेरील अंगणात सडा मारून रांगोळी काढण असो….!
तिन्हीही मुल सकाळी लवकर ऊठून त्यांनी सुरू केलेला बिझनेस वाढवण्यासाठी आणि त्यात ऊत्तरोत्तर प्रगती घडवण्यासाठी अपार कष्ट करत…तिघेही आई-बाबांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडायचे….तसेच घरात येताना पहिल्यांदा घरातील ऊंबरठ्याला हात लावून नमस्कार करून मगच ते घरात प्रवेश करत….नियमच होता तसा सुमतीताईंचा….!
रूद्र, रुग्वेद आणि जय यांना लहानपणापासून ती सवय अंगवळणी पडली होती. सुमतीताईंच्या मते आपण वर्षानुवर्षे राहत असलेली वास्तु आपणाला आशीर्वाद देत असते. त्या वास्तूचा आदर म्हणून घरात प्रवेश करताना आपण वास्तुचे आभार मानूनच घरात प्रवेश करावयाचा.
निलीमा घरूनच आॅनलाईन गायनाचे क्लास घ्यायची, मालतीचे ज्वेलरी शाॅप होते तर ञीशा सध्या घरीच होती पण फॅशन डिझाईनींगचा क्लास करत होती. तिघी सूनाही फार हुशार आणि कामात व्यस्त असणार्या होत्या….पण सुमतीताईंचे नियम त्यांनाही खटकायचे….ते नियम पाळायला त्या कानकून करायच्या. सुनांच्या मते, जग कुठे चाललय आणि आपल्या सासूबाई अजून घराला नमस्कार करा, अंगणात रांगोळी काढा, घर स्वच्छ-टापटीप ठेवा, पाहुण्यांच आदरातिथ्य करा, देवपूजा करा या गोष्टींत अडकून पडल्यात.
सुमतीताईंना हे कळत होत आजकालच्या मुलींना नाही पटायच हे…. पण ज्यावेळी त्यांना या मागच शास्ञ समजेल तेव्हा आज ना उद्या पटेल त्यांना म्हणून त्या सुनांकडून गोड बोलून करून घ्यायच्या. असही सुमतीताईंची मुलं या सगळ्या गोष्टी मनोभावे करायची, त्यामुळे आपले नवरे करतायेत तर त्यांच्या बायकांना करण भागच असायच.
आपल्या सासू-सासर्यांनी आपल्या लग्नाला अजिबात कोणतीही ना करत आपणाला एवढ्या प्रेमाने वागवलय तर काय हरकत आहे त्यांच्या समाधानासाठी हे सगळ करायला इतकी समज तर होतीच मालती, निलीमा आणि ञीशामध्ये…त्यामुळे सुमतीताईंची ‘श्रम-साफल्य’ वास्तु कशी एकदम भारदस्त आणि दिमाखात उभी दिसायची. बाजूच्या रोडवरून जाणारी कोणीही अनोळखी व्यक्ती नकळत त्या वास्तुला डोळेभरून पाहूनच पुढे जायची….कोणास ठाऊक कसे पण त्या वास्तूत खुप सारी सकारात्मक शक्ती असल्यासारखी भासायची…वास्तूकडे पाहिल की आपोआपच मन प्रसन्न आणि चित्त शांत व्हायच.
तिन्ही सांजेच्यावेळी सुमतीताई एका कुंबीत कापुर आणि ओवा पेटवून घराच्या कोपरा न कोपर्यातून फिरवून देवासमोर दिवा लावायच्या व नमस्कार करून, देवाची आणि वास्तूची प्रार्थना करत.
“संसारी या आनंदाची नित्य नवी बरसात
ऊतरला स्वर्ग इथे साक्षात”
अशा भावनेतून त्या वास्तूला म्हणायच्या,
“धरी घरावर चंदनछाया
फुले पसरती सुगंधमाया
सांज लाविते मांगल्याची सदनी या फुलवात”
अशाप्रकारे, सुमतीताईंच्या ओवा-कापुर आणि सांजवातेने घरात खूप प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण होऊन जाई….त्यामुळेच की काय दिवसभर बाहेरच्या लोकांमध्ये, बाहेरील वातावरणात काम करून घरात माघारी येणार्या मुलांचा दिवसभराचा कामाचा थकवा निघून जाई….!
आपसूकच आपल्या हसणार्या मुलांना आणि सुनांना त्यांच्या नवर्यांना पाहून समाधान वाटून घरातील संपूर्ण वातावरणच हसतं-खेळत होवून जायचं….हे सगळ पाहून नारायणराव सुमतीताईंसारखी सुसंस्कारी अर्धांगिनी मिळाल्याबद्दल देवाचे मनोमन आभार मानायचे….पण त्यांनाही कधी-कधी प्रश्न पडायचा की कोणी वास्तू नावाची देवता खरचं अस्तित्वात असते का? ते बरेचवेळा सुमतीताईंना विचारायचे देखील….
त्यावर सुमतीताईंच ठरलेल ऊत्तर असत “हो वास्तू नावाची देवता खरचं अस्तित्त्वात असते आणि याला विज्ञानाची जोड आहे बररं…अहो आपण ज्या वास्तूत राहतो तिला मान द्यायला नको? अगदी मुलासारख प्रेम करायला हव तिच्यावर. तुम्हीच विचार करा, आपण म्हणतो की नाही ‘स्वच्छता जिथे, लक्ष्मी वसते तिथे’ म्हणूनच आपल्या घरात लक्ष्मी आहे कारण आपल्या घरात स्वच्छता असते. घरातील प्रत्येक वस्तू भलेही ती निर्जीव का असेना आपला जीव असतो तिच्यावर…..वर्षानुवर्षे आपल्या सारख्या सजीवांच्या वावरण्यामुळे निर्जीव वास्तुदेखील सजीव होते. तिलाही कान असतात. म्हणूनच आपण घरी बसून केलेली बाहेरच्या लोकांसाठीची प्रार्थना खरी ठरते….वास्तूतील सकारात्मक शक्ती सगळ काही चांगल घडवण्याचा अट्टाहास ठेवते.”
सुमतीताईंच्या ऊत्तराने नारायणरावांना धन्य झाल्यासारख वाटायच व ते मनोमन वास्तूकडे एक कटाक्ष टाकून वास्तुला धन्यवाद द्यायचे…..नारायणरावांना आठवायच की ‘श्रम-साफल्य’ ही स्वतची वास्तू ऊभारण्या अगोदर साधारणत तीस वर्षांपूर्वी ते आणि सुमतीताई जेव्हा भाड्याच्या घरात राहयचे तेव्हा ते घर सोडतानादेखील त्यांना किती ञास झाला होता. तिथेही सुमतीताईंचे वास्तूविषयक सगळे नियम पाळले जात असल्याने मनावर ऊक वेगळेच संस्कार झाले होते; ते भाड्याच घर असूनही, सोडताना जणू ते म्हणत होते आमचा आशीर्वाद आहे तुमच्याबरोबर खुप यश मिळवा, मोठे व्हा….घरातुन सगळ साहित्य टेंम्पोत भरल्यावर पुन्हा सुमती घरात जाऊन चारी भिंतीवर एखाद्या लहान मुलाला कुरवळल्यासारख हात फिरवून डोळ्यांतील आसवे गाळत उभी होती…शेवटी आपण जाऊन सुमतीला सावरून बळेच बाहेर घेउन आलो होतो; तेव्हाही घराबाहेर येऊन तिने घराला नमस्कार करून तुझा आशीर्वाद राऊदे आमच्या बरोबर अशी प्रार्थना केली होती…! खरचं आहे आपल्यावर वास्तुचा आशीर्वाद..!
आणखी एक गोष्ट सुमतीताई आवर्जून करायच्या ते म्हणजे आठवड्यातून एकदा घरातील जो काही फ्लश एरिआ होता तिथे मोठ मीठ टाकायच्या….थोडक्यात सांगायच तर किचन बेसीन, वाॅश बेसीन, टाॅयलेट, बाथरूम सगळीकडे त्या ओंजळ-ओंजळभर मोठ मीठ टाकायच्या. अस केल्याने घरातील नकारात्मकता निघून जाते अस त्यांच मत आणि अनूभव होता….त्याबरोबरच स्वयंपाक करताना अगोदर गॅस शेगडीला नमस्कार करणे व पहिला घास तिला अर्पण करणे. तसेच गाडी चालवण्या अगोदर स्टेरींगला नमस्कार करणे या गोष्टी करणे हा ही एक नियम बनला होता….घरातील सूनबाईंना हे देखील पटायच नाही पण घराचे नियम पाळावे लागायचे.
सुमतीताईंनी निलीमा, मालती आणि ञिशा तिघींनाही त्यांची कामे वाटून दिली होती. घरातील धूण्या-भांड्याला कामवाल्या मावशी होत्या…..पण स्वयंपाक करणे, झाडांना जातीने पाणी घालणे, अंगणात सडा मारणे, रांगोळी काढणे, चार-पाच दिवसांनी घरातील असणार्या सोफे, बेड, खिडक्यांचे, दारांचे पडदे धुवायला टाकणे, देवपूजा-सांजवात करणे, ओवा-कापूर, मीठ टाकणे, हाॅलमध्ये रोज ताजी फुले ठेवणे सुकलेली फुले टाकणे, फर्नीचर पुसणे, अधुन-मधून धुप जाळणे, पाहूण्यांच आदराने स्वागत करणे, त्यांना हव नको ते पाहणे या आणि अशा बर्याच गोष्टी सुमतीताईंनी सुनांच्या कामाच्या, क्लासच्या वेळा पाहून आणि त्यांची गैरसोय न होता वाटून दिल्या होत्या.
सुनबाई या सगळ्या जबाबदार्या पार पाडत त्यामुळे वास्तू एकदम प्रसन्न, टवटवीत राही. आपसूकच घरातील वातावरण खेळी-मेळीच होई….हे सगळ त्या तिघी सुमतीताईंच्या सांगण्यावरून, त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी करीत पण मनातुन त्यांना वास्तु-आशीर्वाद देते वैगेरे या गोष्टींवर तितकासा विश्वास बसत नव्हता….सुमतीताईंच्या तिक्ष्ण नजरेला ते जाणवायच…..बर्याचवेळा सुमतीताईंना हा प्रश्नदेखील पडायचा की, आपल्या मागे यांनी हे सोपस्कार करायचे सोडले तर…..तर नकोच हा विचार पण त्यावर काहीतरी ऊपाय शोधून काढायला हवा हे दुरदृष्टी असणार्या सुमतीताईंना पटत होत आणि म्हणुनच त्या एक शक्कल लढवतात.
मागील पंचवीस वर्षात….कधीही घरा बाहेर मुक्कामासाठी राहयला न गेलेल्या सुमतीताई महिनाभर बहिणीकडे राहून येते सांगून निघतात. बरोबर नारायणरावांनाही घेतात.
सुमतीताई चक्क घरावर एवढ प्रेम असून महिनाभर घर सोडुन राहणार या विचाराने मुलांना आणि सुनांना आश्चर्य वाटतं. पण सुमतीताई सर्वांना सगळ्या सुचना देऊन निघतात आणि काळजी करू नका मनाला तेवढच प्रसन्न वाटाव म्हणून मी चाललेय; येईन लवकरच अस बोलून मुलांना दिलासा देतात. नेहमी “तुझ आहे तुझपाशी, परी का बाहेर शोधिशी” म्हणणारी सुमती आज बाहेर जाउन मन प्रसन्न करण्याच्या गोष्टी का करतेय हा प्रश्न नारायणरावांनाही पडला होता.
हुशशश…..आईसाहेब एक महिनाभर घरात नाहीत म्हटल्यावर तिघी सुनांना कोण आनंद झाला होता….मनातून हुरळून गेल्या होत्या तिघीही. निलीमाने आज राञी स्वयंपाकाला सूट्टी देऊयात अस ठरवल त्याला बाकीच्या दोघींनीही सहमती देऊन जेवणाच पार्सल आणायच्या पदार्थांची लिस्ट आपल्या नवर्यांना दिली. संध्याकाळी देवासमोर दिवा लावला पण पूर्ण अंधार पडल्यावर तेही आठ वाजता….!
रूद्र, रूग्वेद, जय घरी आल्यावरती त्यांना घर वेगळच भासलं. राञी घरी आल्यावर ना धूप-दीपाचा सुगंध दरवळत होता ना प्रसन्न वाटत होत….आईचा हसरा चेहराही नव्हता त्यांची विचारपूस करायला….!
आई-बाबांची कमी तर भासणारच होती त्या तिघांना….पण ठीक आहे ना आई-बाबा आजवर आपल्यासाठी कधी-कुठे फिरायलाही गेले नाहीत; आता सगळेजण वेल सेट्लड आहेत, तेव्हा फिरून येऊदे आई-बाबांना या विचाराने तिघांनी आपल्या मनाला समजावल. राञी जेवणाच्या टेबलावर बाहेरचे पदार्थ बघूनच तिघांचीही भूक अगोदरच गेली होती….झोपायला गेल्यावरही तीच समस्या…..सुमतीताई रोज राञी झोपण्या अगोदर खोबरेल तेल कोमट करून सर्वांच्या डोक्याची मालिश करून द्यायच्या; त्यामुळे रूद्र, रूग्वेद, जय, निलीमा, मालती आणि ञिशा या सर्वांना छान शांत झोप लागायची.
सकाळपासून आई बाहेरगावी गेल्या आहेत म्हणून खूष असलेल्या तिघी सुनांनाही आता सुमतीताईंची आठवण आली. आजच्या फॅशनच्या जमान्यात लोक डोक्याला तेल लावत नाहीत पण त्यामुळे डोकं गरम होत. त्यासाठी निदान राञी तरी डोकं शांत होऊन झोप लागण्यासाठी डोक्याला तेल लावणं गरजेच आहे; अस सुमतीताईंच मत होतं….आणि आज त्याची प्रचिती घरातील सर्वांना आली होती….!
दुसर्या दिवशी ऊठायला सर्वांनाच ऊशीर होतो. कारण राञी कोणाचीच व्यवस्थित झोप झालेली नव्हती……सकाळी ऊशीरा ऊठल्यामुळे तिघा मुलांची आणि त्यांच्या बायकांचीही चिडचीड सुरू होते. सुमतीताईंचा घरातील आणखी एक नियम म्हणजे घरातील कोणतीही वस्तू वापर झाला की आहे त्या जागेवर ठेवण्याची….निदान या सवयीमुळे ऊशीरा ऊठलेले असले तरी, आपआपल्या वस्तू त्यांना पटकन सापडतात…व पुढच्या कामासाठी त्यांना तयार होता येतं. सुमतीताईंची घराला लावलेली ही सवय देखील इथे सर्वांसाठी फायदेशीर ठरते…त्या सर्वांना नकळत ते जाणवतही…!
सकाळची देवपुजा मोठ्या सुनबाई निलीमा कशातरी आटपुन घेतात पण देवाला फुले वाहयला त्यांना वेळ मिळत नाही कारण तिचा गायनाचा आॅनलाईन क्लास होता…..त्यामुळे देव्हार्यातील फुलाचा सुगंध हरवतोच पण निलीमा नेहमी ज्या सुरात गाणे गात असते, त्यादिवशी तो सुरदेखील बिघडलेला असतो…कदाचित देवार्यातील सरस्वतीदेवींनाही फुलांच्या सुगंधाची तेवढीच सवय झाली असावी…..!
संध्याकाळी सर्वजण घरी येतात; तेव्हाही सर्वांना घरात नकारात्मकता जाणवते. तसही बाहेर असताना देखील सर्वांना नेहमीपेक्षा वेगळेच अनुभव आलेले होते; चिडचीड, किटकीट, भांडण अस काहीस घडल होत प्रत्येकाबरोबर…!
राञी सगळेजण या गोष्टींवर बसून विचार करतात. त्यांना कळून चुकत की सुमतीताईंनी घरातील जे काही नियम बनवले आहेत; ते योग्य आहेत. फक्त पैसा कमवला म्हणजे सर्व काही होत नाही….तो टिकतो तो वास्तू-आशीर्वादामुळे! आपण ज्या घरात राहतो; ज्या घरासाठी पैसा कमावतो त्याच घरात काम करायला आपणाला वेळ नसतो. घरात काम करणं, घरात स्वच्छता ठेवणं, घरावर प्रेम करणं या गोष्टींमुळे घरातील वातावरण शूद्ध, पविञ राहत आणि आपोआप त्याचा सकारात्मक परिणाम घरातील सदस्यांवर होतो….!
आपली चूक उमगून निलीमा, मालती, ञिशा दुसर्यादिवशी सकाळी लवकर उठून सगळे सोपस्कार पुर्ण करतात. तेव्हा कुठे घरात प्रसन्नता पसरून घर हसू लागत…..ज्या कुटूंबावर वास्तू प्रसन्न असते तिथे सदैव गृृृहस्वामीनींच्या चेहर्यावर हास्य आणि जिभेवर प्रसन्न गाणं नक्कीच असतं…!!
©माधुरी दिपक पाटील
फोटो_साभार_google & pixabay
कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असतील…..धन्यवाद..!!
असेच छान ब्लाॅग वाचण्यासाठी “रंग आयुष्याचे” या फेसबुक पेजला नक्की फाॅलो करा…!
Comments 1